जीवनधारा संस्थेची स्थापना, इतिहास आणि आमचे ध्येय
डॉ. वा. ना. तुंगार
संस्थापक अध्यक्ष"दिव्यांगांसाठी एक नवीन जग निर्माण करणे हे माझे स्वप्न आहे"
डॉ. वा. ना. तुंगार यांनी दिव्यांगांच्या क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ निस्वार्थपणे सेवा केली आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.
मुळशी तालुक्यात सुरू केलेल्या समाजाधारित पुनर्वसन कार्यक्रमामुळे १४४८ दिव्यांगांचे जीवन बदलले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची दखल घेऊन तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. अब्दुल कलाम यांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.
एक असे समाज निर्माण करणे जिथे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी, आदर व सन्मान मिळेल. जिथे दिव्यांगत्व हे अडथळा नसून एक वेगळी शक्ती मानली जाईल.
ग्रामीण व शहरी दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन केंद्र उभारणे व त्यांना आत्मनिर्भर जीवन जगण्यास सक्षम करणे हे आमचे दीर्घकालीन स्वप्न आहे.
सन १९६८ साली जीवनधारा दिव्यांग सहाय्यकारी संस्थेची स्थापना जाली. दिव्यांगांसाठी समर्पित सॆजन्य सेवा सुरू केली.
मुळशी तालुक्यात १४४८ दिव्यांगांचे (८३५ पुरुष, ६१३ स्त्रिया) सर्वेक्षण पूर्ण केले.
तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिव्यांगांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाकडून १४ दिव्यांगांना दुग्धोत्पादनासाठी प्रत्येकी १ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले.
सन १९८५ साली विशेष मुलांसाठी जीवनधारा विद्यालयाची स्थापना. मतिमंद व दिव्यांग बालकांसाठी विशेष शाळा सुरू केली. प्रशिक्षित शिक्षक व आधुनिक सुविधांसह.
संस्था आजही दिव्यांगांसाठी शिक्षण, वैद्यकीय उपचार, व्यावसायिक प्रशिक्षण यांमध्ये अखंडपणे कार्यरत आहे.